पंढरीनाथ
पंढरपूर - विकिपीडिया
{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.पंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पंढरपूरहे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपूरची लोकसंख्या ५३,६३८ (१९७१) इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. आहे. हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे. पंढरपूर या क्षेत्राचे प्राचीन कन्नड नाव 'पंडरगे' असे आहे.[१]
| ?पंढरपूर महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
![]() | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ • उंची | १,३०३.६ चौ. किमी • ४६५.१२ मी |
| जिल्हा | सोलापूर |
| तालुका/के | पंढरपूर |
| लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर | ४,०२,७०७ (२००१) • ३०९/किमी२ ९१७ ♂/♀ |
पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचेकुलदैवत म्हणतात. [२].हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे.पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मूर्ती आहेत
प्राचीनत्व व नावे
इतिहास
चंद्रभागा
भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा (भिवरा) इंद्रायणी- भामा- नीरा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते. रेल्वे पूल ते विष्णुपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते. म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले. स्कंद पुराणातील माहात्मेय ‘चंद्रभागा’ नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ (जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आधीचे आहे.) होते, असे सांगते. तर, संत जनाबाई ‘भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा’ असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात. पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते. नद्यांचा अभ्यास करणाऱ्यांना हे नावाचे कोडे उलगडलेले नाही. इ.स. १८५० सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तेथे सापडला होता. म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असे दिसते. काळाच्या ओघात आता काही नाही. पंढरपुराच्या पंचक्रोशीतील जवळील नद्या म्हणजे दुर्गादेवीजवळची धारिणी, भुवनेश्वरीजवळची पुष्पावती (जी मूळची यमुना कृष्णाबरोबर पंढरपुरात आली), संध्यावळीजवळच्या शिशुमाला-भीमासंगम, उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा, सती, सुना, भृंगारी आणि पंचगंगा, यांचा भीमेशी संगम होतो. त्यामुळे संत मंडळी अभंगातून बऱ्याच वेळा भीमा भिवराकाठी देव असल्याचा उल्लेख करतात.
- पर्यावरणीय ऱ्हास
भीमा नदीमध्ये प्रचंड प्रदूषण झाले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड पासून ते पंढरपूरपर्यंत अनेक साखर कारखाने आपले दूषित पाणी या नदीच्या पात्रामध्ये सोडतात. या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 'नमामि चंद्रभागा अभियान' हाती घेतले आहे. यामध्ये भीमाशंकरपासून ते रायचूरपर्यत या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर चंद्रभागा वाळवंटात घाट बांधणी, स्वछता, नदीकाठी वृक्ष लागवड अश्या गोष्टींवर भर देण्यात येणार आहे. हा नदीचे रूप पालटवण्याचा प्रयत्न आहे, अद्याप त्यावर ठोस काम होणे अपेक्षित आहे.
- नमामि चंद्रभागा ही योजना सरकारद्वारे २०१५ साली सुरू करण्यात आली पण या योजनेचे काम खूप मंद गतीने सुरू आहे आहे. पण या योजनेमुळे कदाचित चंद्रभागा नदीची झालेली दुरवस्था नीट होईल.
तीर्थक्षेत्र
लोकसंख्या
भौगोलिक स्थान
पांडुरंगाचे (म्हणजेच buddha) देऊळ
पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे.
शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इ.स. ८३मध्ये जीर्णोद्धार केला.
ताम्रपटांवरून इ.स. ५१६ मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो.
इ.स. १२३९ च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे.
पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली; तर इ.स. १६५० मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा पाडली.
देऊळ व मूर्ती यांवर अनेकदा मुसलमानी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळी मंदिर परत बांधण्यात आले.
काहींच्या मते हे स्थान मूलतः शिवाचे होते तर वैष्णव पंथीय हे विष्णूचे स्थान मानतात.
जैनधर्मीय यास नेमीनाथ समजतात तर
बौद्धांच्या मते हा अवलोकितेश्वर आहे. या दैवतास सूर्याचा अंशही मानतात.
गोपाळपूर
पंढरपुरातील गोपाळपूर या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर आहे. या मंदिराच्या पायथ्याशी जनाबाईचे देऊळ आहे. पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक जनाबाईच्या देवळातील घुसळखांब घुसळल्याशिवाय जात नाही.
चार प्रमुख एकादश्यांना (आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री) आलेले भाविक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी होणारा गोपाळकाला खाण्यासाठी येथे एकत्र जमतात.
विष्णुपद
या ठिकाणी सर्व लोक विष्णूच्या पावलांचे दर्शन घेतात. येथे मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंगाचे वास्तव्य असते. या महिन्यात येथे भाविकांची खूप गर्दी असते. या ठिकाणी आजही श्रीकृष्णाचे व गायीच्या खुरांचे ठसे दिसतात, असे सांगितले जाते. .विष्णुपद या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते.
वर्णन
चंद्रभागेच्या वाळवंटा(नदीकाठच्या छोट्याशा वाळूच्या मैदाना)पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलीक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो.
दगडी तटबंदीमागे हे विठ्ठलाचे देऊळ एका टेकडावर आहे. सुमारे ५२ मीटर रुंद व १०६ मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत.
पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक दार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला `नामदेव पायरी' म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेलपट्टी वगैरे पुरातन चुनेगच्ची नक्षीकाम आहे .
मंदिराचे स्वरूप
मंडप १८ मीटर रुंद व ३७ मीटर लांब असून बाजूस असलेल्या ओवऱ्यांत सुंदर लाकडी कोरीवकाम दिसून येते. सुमारे १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णुवाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील सोळा-खांबीत एका लहान सभामंडपातून जाता येते. येथील दाराचे बाजूस सुरेख जय-विजय व तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मढवली आहे. डाव्या बाजूस खजिन्याची खोली आहे. सोळा कोरीव दगडी खांब असून भाविकांच्या आशयाचा गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविला आहे. आत प्रवेश करताना उजव्या हातास संत एकनाथमहाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराजांची समाधी आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओवरी असून त्यात
काशीविश्वनाथ, रामलक्ष्मण, काळभैरव, रामेश्वर, दत्तात्रेयआणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत.
चौखांबीच्या दरवाजास चांदीचे नक्षीदार पत्रे लावले आहेत. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर दोन मीटर चौरस गाभारा लागतो.
रुक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत. विठ्ठलाचेच परमभक्त पुंडलीक याची समाधी महाद्वार घाटावर आहे.
देवळास समांतर पूर्वेकडे जाणाऱ्या गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व बाराही घाटांचा वापर वारकरी करतात.
त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेरकर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्त्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजनकीर्तनास वापरतात.
मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेमधून अनेक भक्तांची व वारकऱ्यांची सोय होते. सर्व पंढरपुरातच भाविकांची वर्दळ असते.
सजावट
विठोबाचे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घालतात. देवाच्या काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक पूजोपचार असतात. यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगाचे दर्शन झाले नाही, तर देवालयाच्या शिखराच्या दर्शनाने भाविक लोक समाधान मानतात.
देवालयाच्या उत्पन्नाबाबात व तेथील बडवे, सेवेकरी, उत्पात, डांगे, बेणारे इत्यादींच्या ह्क्कांबाबत पूर्वापार तंटेबखेडे होत आले आहेत; आणि त्यांबाबत निरनिराळ्या वेळी निर्णयही झाले आहेत. शासनाने नाडकर्णी आयोग नेमून देवालय व्यवस्थेबाबत काही निर्णय केले होते, तथापि त्यासंबंधी पुढील न्यायालयीन वाद चालू आहेत.
परिसर
नदीकाठी चौदा घाट बांधलेले आहेत. मात्र ते सलग नाहीत. पुंडलिकाच्या देवळाच्या
दक्षिणेस सुमारे १.२ किमी. वर विष्णुपद-वेणुनाद हे स्थान आहे.
गावाच्या दक्षिणेस सुमारे १.६ किमी. वर गोपाळपूर येथे गोपालकृष्णाचे देऊळ आहे. यांशिवाय
पंचमुखी मारुती,
भुलेश्वर,
पद्मावती (देऊळ आणि तळे),
व्यास,
अंबाबाई,
लखूबाई,
यमाई,
जोतिबा,
नगरेश्वर,
सरकारवाडा महादेव,
त्र्यंबकेश्वर,
ताकपिठ्या विठोबा,
कोटेश्वर,
गोंदवलेकर राम,
खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल,
रुक्मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती,
नामदेवमंदिर,
शाकंभरी (बनशंकरी),
मल्लिकार्जुन,
तांबडा मारुती,
मुरलीधर,
गारेचा महादेव,
चंद्रभागा,
दत्त,
वटेश्वर महादेव,
बेरीचा महादेव,
काळा मारुती,
चोफाला (विष्णुपंचायतन),
पारावरील दत्त,
बाभळ्याचा महादेव,
अमृतेश्वर
ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली असून येथील
प्रेक्षणीय आहे.
१९४६ मध्ये साने गुरुजींनी महात्मा गांधींचा विरोध डावलून, हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले.
चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देहूकर
यांची व गोविंदबुवा अंमळनेरकर,
गोविंदबुवा चोपडेकर,
भानुदास महाराज वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत.
यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात.
त्रैलोक्यनाम भवन,
तनपुरे मंडप
वगैरे इतर महत्त्वाच्या वास्तू पंढरपुरात आहेत.
नदीवरील घाट
- १ अमळनेर
- २ अहिल्याबाई
- ३ उद्धव
- ४ कबीर
- ५ कासार
- ६ कुंभार
- ७ खाका
- ८ खिस्ते
- ९ चंद्रभागा
- १० दत्त
- ११ दिवटे
- १२ मढे
- १३ महाद्वार आणि
- १४ लखुबाई
नावांची व्युत्पत्ती व मंदिराचा इतिहास
मूर्ती
यात्रा
टाळमृदंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात.
झेंडे, तुताऱ्या. सजवलेला स्वारीचा घोडा, अब्दागीर, पालख्या, इतर घोडे, बैलगाड्या यांचे ताफे व डोक्यावर तुळशीवृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते.
चैत्री वारीच्या वेळी पंढरपुरात म्हशी-गाईंचा मोठा बाजारभरतो.
यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाच्या मूर्ती, तांब्या-पितळेची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी मांडली जातात व मोठा व्यापार होतो.
इ.स. १८१० मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा होऊ लागली.
आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्याजवळ ग्रामप्रदक्षिणेला सुरवात होते. समोर हत्ती व घोडे असलेला हा रथ भाविक ओढतात.
आंत विठ्ठल, राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात.
या ‘भक्तिसंप्रदायाच्या आद्यपीठा’त आणि ‘भीमातटीय महायोगपीठा’त महाराष्ट्राच्या सर्व भागांतून आणि कर्नाटकादी इतर राज्यांतूनही प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशांस हजारो वारकरी आणि यात्रेकरू लोटतात. चैत्रातील व माघातील यात्रा त्या मानाने लहान असतात.
महाराष्ट्रातील सामान्य माणसाचे हे श्रद्धास्थान आहे.गरिबापासून श्रीमान्तापायंत सार्वजन दरवर्षी मनोभावे इथे भेट देतात.
गावाचे स्वरूप
पंढरपुर हे महाराष्ट्रचे एक सुविख्यात तीर्थ आहे. भीमा नदीच्या काठावर वसलेले हे तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे.
आषाढ महिन्यात इथे जवळ जवळ ५ लाखापेक्षा जास्त लोक पंढरपूर यात्रेमध्ये भाग घेण्यासाठी देशभरातून पताका घेऊन या ठिकाणी पायी चालत येतात.
येथील नगरपालिका १८५८ मध्ये स्थापन झाली असून
गावास शुद्ध पाणीपुरवठा, अग्निशामक सेवा, घरगुती, औद्योगिक, व्यापारी आणि सार्वजनिक उपयोगांसाठी वीज इ. सोयी आहेत. गटारे उघडी असून संडास सफाई भंग्यांमार्फत व मैलावाहतूक ढकलगाडी व ट्रॅक्टरमार्फत होते.
यात्रेच्या दिवसांत सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य राखणे हे एक आव्हानच असते.
सवाई माधवराव पेशव्यांच्या वेळीही घाणेरड्या गल्ल्या साफ करवून घेण्याबद्दल व त्यासाठी हलालखोरांस घर पाहून दरमहा एक-दोन पैसे देण्याबद्दल हुकूम झाला होता.
गावात नऊ रुग्णालये व २११ रुग्णशय्या, दोन शुश्रूषागृहे व ६० रुग्णशय्या, २० दवाखाने व कुटुंबनियोजन केंद्र आहे. यांशिवाय यात्रेच्या वेळी खास वैद्यकीय सोयी आणि रोगप्रतिबंधक व्यवस्था केली जाते.
गावातील ५७-६ टक्के लोक साक्षर व शिक्षित असून पुरुषांपैकी ७० टक्के स्त्रियांपैकी ४४.१ टक्के साक्षर व शिक्षित आहेत.
येथे वाङ्मय, विज्ञान व वाणिज्य शाखांचे एक महाविद्यालय, आठ माध्यमिक शाळा, २८ प्राथमिक शाळा, चार इतर (टंकलेखन, लघुलेखन व व्यावसायिक) शाळा, एक सार्वजनिक वाचनालय तसेच तीन चित्रपटगृहे आहेत.
गावात १९७१ मध्ये ५,४०७ राहती घरे व ९,८३८ कुटुंबे होती. तसेच ५३,६३८ लोकसंख्येपैकी २७,९७२ पुरुष व २५,६५६ स्त्रिया, अनुसूचित जातींचे २,५६४ पुरुष आणि २,२,६७ स्त्रिया, अनुसूचित जमातींचे ४८ पुरुष व ४४ स्त्रिया होत्या.
प्रमुख संस्था
गावात पक्के रस्ते ३४.५३ किमी. व कच्चे रस्ते १.५३ किमी. असून देवळाभोवतीच्या जुन्या वस्तीत अरुंद फरसबंदी बोळ आहेत.
नव्या वस्तीत रुंद रस्ते, मोठमोठ्या इमारती व
मुक्ताबाई,
नाथ महाराज
रोहिदास,
तनपुरे महाराज,
कैकाडी महाराज,
घाटगे महाराज
इत्यादीचे मठ व धर्मशाळा आहेत.
गोरक्षण,
अनाथ बालकाश्रम,
नवरंगे अनाथ बालकाश्रम,
फाउंडलिंग होम,
संस्कृत पाठशाळा,
मिशन रुग्णालय
इ. संस्था येथे मोलाचे समाजकार्य करतात. येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय व पोलिसठाणे आहे.
मंगळवारी आठवड्याचा बाजार भरतो.
तांदूळ, गहू, इतर अन्नधान्ये, कापूस, तंबाखू, जर्दा, तपकीर, अगरबत्ती, घोंगड्या इत्यादींची मोठी देवघेव होते.
यात्रेच्या वेळी गुरे व घोंगड्या यांचा मोठा बाजार असतो.
येथे आठ बॅंका व दोन कृषीतर पतसंस्था आहेत.
यात्रेच्या निमित्ताने कुंकू, बुक्का, लाह्या, चुरमुरे, डाळे, खण, बांगड्या, तुळशीमाळा, अष्टगंध यांचा चांगला खप होतो. वारकऱ्यांस लागणारे टाळ, मृदंग, चिपळ्या इ. वस्तूही येथे मिळतात.
शैक्षणिक संस्था
- कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर
- विवेक वर्धिनी विद्यालय - काळा मारुती चौक
(इ.५ वी ते १० वी )पर्यंतची शाळा. याची एक शाखा सुस्ते येथे आहे.( श्री दत्त विद्या मंदिर सुस्ते)
- कवठेकर प्रशाला — नाथचौक इ.१ ली ते १० वी)
- आर्दश प्राथमिक प्रशाला
- आपटे प्रशाला
मंदिरे
विठ्ठलमंदिर हे अर्थातच गावातील सर्वात प्रमुख मंदिर आहे.
विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे.
पंढरपुरास भीमा (भीवरा) नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला ‘चंद्रभागा’ म्हणतात.
तिच्या वाळवंटात पुंडलिकाचे देवालय (समाधी) आहे.
येथून विठ्ठलमंदिर सुमारे २०० मीटरवर आहे. मध्यवस्तीतील हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे १०७ मीटर व दक्षिणोत्तर रुंदी सुमारे ५२ मीटर आहे. देवळास तटबंदी असून त्याला पूर्वेस तीन, दक्षिणेस एक, पश्चिमेस एक व उत्तरेस तीन असे एकूण आठ दरवाजे आहेत.
पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरून पोहोचण्यास बारा पायऱ्या आहेत. त्यांतील पहिली पायरी ही नामदेव पायरी होय. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात.
या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोपऱ्यात संत चोखामेळा याची समाधी आहे.
नामदेव दरवाजाने आत जाताच छोटा मुक्तिमंडप आहे.
तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे.
नंतरच्या चौकात तीन दीपमाळा
व प्रल्हादबुवा बडवे
आणि
कान्हया हरिदास यांच्या समाध्या आहेत.
पंढरपुरात
गरुडाचे व
समर्थ रामदासांनी स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे.
यानंतरच्या अरुंद दगडी मंडपाच्या (सोप्याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या दोन बाजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेशआणि सरस्वती आहेत.
मघल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो.
तेथे छतावर दशावताराची व कृष्णलीलेची चित्रे आहेत.
बाजूच्या खोलीवजा दालनांत
राम-लक्ष्मण,
नरसोबा
यांच्या मूर्ती आहेत.
दूसरा खांब सोन्याचांदीने मढविलेला असून त्यावर छोटी विष्णुमूर्ती आहे. येथे पूर्वी गरुडस्तंभ होता असे सांगतात. या खांबाला मिठी घालून मग पुढे जातात.
यानंतर चौखांबी मंडप आहे. तेथे उत्तरेस देवाचे शेजघर आहे. नंतरची चौरस जागा ‘कमान’ नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. तेथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती असून तिची उंची एक मीटरपेक्षा किंचित जास्त आहे.
१८७३ मध्ये काही शैव बैराग्यांनी धोंडा मारल्यामुळे मूर्तीचा पायदुखावला होता; तेव्हापासून पायांस न कवटाळता त्यांवर फक्त डोके ठेवू देतात.
सोळखांबी मंडपाच्या दक्षिण दरवाजाबहिर एका ओसरीत चार मूर्ती,
एक तरटीचे झाड व त्याच्या पायाशी
कान्होपात्रेची मूर्ती, नंतर
व्यंकटेशमंदिर, त्यासमोर
नागोबा,
बाजीराव पेशव्याने बांधलेली ओवरी तसेच
लक्ष्मीमंदिर आहे.
ओवरीत नारदाची
व कोपऱ्यात रामेश्वराची मूर्ती
असून पश्चिमेच्या भिंतीत सूर्य,
गणेश,
खंडोबा व
नागोबा यांच्या मूर्ती आहेत.
विठ्ठलमंदिरामागे वायव्येस रुक्मिणीमंदिर आहे.
जवळच सत्यभामा व
राही यांच्या खोल्या आहेत.
सभामंडपाच्या पायऱ्या चढून आल्यावर समोर सुवर्णपिंपळ आहे.
येथून पुन्हा सोळखांबी मंडपात आले म्हणजे एका भिंतीत ‘चौऱ्याऐंशीचा शिलालेख’ असून त्यावर देवी आहे.
जन्ममरणांच्या फेऱ्यांतून सुटण्यासाठी लाखो भाविकांनी या शिलालेखाला पाठ घासल्यामुळे तो गुळगुळीत झाला आहे. आता त्यावर लोखंडी जाळी बसविली आहे.
देवळात रंगशिला,
गारेच्या पादुका इत्यादी विशिष्ट महत्त्वाच्या जागा आहेत.
इतर मंदिरे
- श्री नामदेव मंदिर - पंढरपुरातील संत नामदेवांच्या स्मृतीसंबंधित महत्त्वाची वास्तू.
- कैकाडी महाराज मठ
- अहिल्याबाईनी बांधलेला वाडा - राम मंदिर
- शिंदे सरकार द्वारकाधिश मंदिर
- केशवराज मंदिर - नामदेव समाज
- सद्गुरु सीताराम महाराज मंगळवेढेकर, यांचे समाधीस्थळ खर्डी येथे असून ते पंढरपूर-सांगोला या रोडवर, पंढरपूर पासून ११ किलोमीटर आहे
पंढरपूरच्या समृद्ध वारशाची जपणूक : योजना
पंढरपूरचा वारसा जपणे, तेथील मठ, फड, मंदिरे यांचा इतिहास शोधणे यासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाने डॉ. सदानंद मोरे आणि वा. ल. मंजूळ यांच्याकडे हा एक प्रकल्प सोपविला होता. २०१५ सालच्या जुलै महिन्यात हा प्रकल्प पूर्ण झाला आणि त्याचे तपशील ग्रंथरूपाने लोकांसमोर येत आहेत.[ संदर्भ हवा ]
सर्वसामान्यांना पंढरपूर घरबसल्या दाखवणारी ‘पंढरपूर आणि श्री विठ्ठल’ ही दूरदर्शनवर नव्याने सुरू होणारी मालिका आकार घेत आहे. त्यामध्ये
१) पुराणकालीन कथा भाग,
२) संतांची कामगिरी,
३) सामाजिक प्रबोधन असे तिहेरी स्वरूप आहे.
त्या दृष्टीने काही मंडळी काम करीत आहेत.[ संदर्भ हवा ]
भीमा की चंद्रभागा,
तिचा इतिहास,
आजचे स्वरूप,
तीर्थस्वरूप होण्यासाठी काय करणे आवश्यक याचा सखोल विचार महाराष्ट्र सरकारच्या इरिगेशन खात्यातर्फे ‘भीमा सर्वेक्षण’ हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होत आहे,
त्यामुळे तिच्या काठावरची सर्व क्षेत्रे लोकांसमोर (क्रमशः उगमापासून कृष्णेला मिळेपर्यंतची) येणार आहेत. यासंबंधी प्राथमिक विचार चालू आहे.
या खेरीज पंढरपूरचा क्षेत्रीय वारसा, तेथील वास्तू, नगररचना, लोकजीवन, विविध कला आणि परंपरा यांचा अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या सिंहगड कॉलेजच्या पदव्युत्तर वास्तू विभाग (एम आर्किटेक्चर डिपार्टमेंट) आणि भोपाल - मध्य प्रदेशच्या एस.पी.ए. कॉलेज यांच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे जानेवारी २०१५ ते एप्रिल २०१५ हे चार महिने काम केले.
अठरा विद्यार्थ्यांनी प्रा. वैशाली लाटकर (पुणे), प्रा. विशाखा कवठेकर (भोपाळ) आणि प्रा. रमेश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अवघड काम केले.
नाव ‘वास्तुशास्त्रीय अभ्यास’ असले तरी क्षेत्र पंढरपुराचा सर्वांगीण अभ्यास जो आजवर कधीच केला गेला नाही, तो या वर्षी त्यांच्या हातून घडला.[ संदर्भ हवा ]
या प्रकल्पामध्ये पंढरपुरास येणाऱ्या भाविकांची वाढलेली संख्या,
त्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा, या
सुविधा पुरविताना येणाऱ्या अडचणी,
ते कार्य करताना क्षेत्राचा समृद्ध वारसा जपणे,
केवळ ऐतिहासिक -
धार्मिक -
सामाजिक वास्तू,
वाडे,
बाजार,
नदीवरचे घाट,
परंपरा सांभाळणाऱ्या गल्ल्या-बोळ,
तेथील लहान-मोठी मंदिरे
या सर्वांचा वास्तुविषयक अभ्यास या विद्यार्थ्यांनी केला. जो लवकरच म्हणजे वारीच्या काळात प्रदर्शन रूपात पुणेकरांना पाहावयास मिळेल.
पंढरपुरातील छोटे उद्योग कुंकू-बुक्का-अष्टगंध,
उदबत्ती तयार करणारे कारखाने,
तुळशीच्या माळा आणि
लाखेच्या बांगड्या तयार करणारे कारागीर,
जुने ऐतिहासिक वाडे, .
जवळपासचे पंचक्रोशीतील मंदिरे,
त्यांचा इतिहास,
धार्मिक महत्त्व आदी गोष्टी महत्त्वाच्या मानून,
त्याचा या प्रकल्पात सविस्तर अभ्यास केला गेला आहे.
पंढरपूरमधील मठांचा आणि फडांचा इतिहास
वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ असा बहुमान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूरमधील मठ, फड आणि दिंड्यांचा ग्रंथबद्ध इतिहास प्राचीन हस्तलिखितांचे अभ्यासक वा.ल. मंजुळयांनी एका प्रकल्पाद्वारे केला असून त्यांना संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
पंढरपूरमध्ये आषाढी वारीचा मुख्य सोहळा,
काíतकी एकादशी,
चत्री आणि
माघी एकादशीनिमित्त
वारीच्या काळात येणाऱ्या भाविकांच्या वास्तव्यासाठी
ज्या वास्तू अनेक वर्षांपासून उभ्या आहेत, त्यांना ‘मठ’ अशी संज्ञा आहे.
तसेच या भौतिक रचनेपलीकडे जाऊन, तत्त्वज्ञानाच्या आणि धार्मिक अंगाने विशिष्ट धर्माचरण करणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहाला ‘फड’ असे म्हटले जाते.
पंढरपूरमध्ये असे अनेक मठ आणि फड अस्तित्वात आहेत.
त्यांना संस्था आणि संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाल्याने त्यांचे मठाधिपती आणि फडकरीही आहेत.
सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्टय़ा मठ, फड आणि दिंडय़ा यांचे महत्त्व आहे.
त्यामुळे मठ-फडांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करायला हवा, ही कल्पना सर्वप्रथम ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. ग. हर्षे यांना सुचली होती. तसा प्रकल्पही त्यांनी हाती घेतला होता. पण, त्यांचा अकाली मृत्यू झाल्याने हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही.
डॉ. हर्षे यांनी सुरू केलेल्या कामाचे तपशील वा.ल. मंजूळ यांना उपलब्ध झाले आणि त्यात मोलाची भर घालून त्यांनी पंढरपूरमधील मठ-फडांचा-दिंड्यांचा इतिहास शब्दबद्ध केला.
- ग्रंथात काय आहे ?
- पंढरपूरमधील ४० प्रमुख मठांचा इतिहास
- साडेतीनशे दिंड्यांचा इतिहास
- ६० फडांची माहिती
- मठ, फड, दिंडी यांच्या व्याख्या आणि महत्त्वाच्या नोंदी
- मूळ अभ्यासक डॉ. हर्षे यांचे मनोगत
- संशोधनाची मीमांसा
पंढरपूरचा स्थापत्यशास्त्रीय अभ्यास
पुणेकर संशोधक डॉ. वैशाली लाटकर यांनी ‘आर्किटेक्चरल स्टडीज ऑफ पंढरपूर’ असा संशोधन प्रकल्प हाती घेऊन तो पुरा करत आणला आहे. (मार्च २०१७ची बातमी).
डॉ. वैशाली लाटकर या कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट असून त्या या प्रकल्पावर पाच वर्षे काम करीत होत्या.
त्या पाच वर्षांत त्यांनी पंढरपूरमधील शेकडो जुन्या वास्तू,
मंदिरे,
मठ,
फड आणि
घाट यांचा स्थापत्त्यशास्त्रदृष्ट्या अभ्यास केला.
पंढरपुरात यादवकाळापासूनच्या वास्तू आढळतात. कित्येक मंदिरे, मठ, वाडे, घाट आणि फड यांना अनेक वर्षांचा इतिहास आहे.
तो जसा लिखित स्वरूपात आढळतो त्यापेक्षाही त्या काळाचे थेट साक्षीदार असणाऱ्या म्हणजे तत्कालीन वास्तूंच्या स्वरूपात आढळतो.
वास्तुसंवर्धकतज्ज्ञ या नात्याने काम करताना डॉ. वैशाली लाटकर यांनी
पंढरपुरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तूंचा प्रामुख्याने विचार केला.
त्यांमध्ये मंदिरे, मठ, फड, जुने वाडे, घाट अशा वास्तूंचा समावेश आहे. त्यांच्या मते, फड ही वास्तू फक्त पंढरपूरमध्येच आढळते.
पुराण वाङ्मयात येथील वास्तूंचे खूप संदर्भ आढळतात. ह्या वास्तूंमध्ये अनेक जुन्या वस्तू आणि हस्तलिखिते यांचे जतन केलेले आहे.
हे सारे आपल्या सांस्कृतिक वैभवाचे स्रोत आहेत, मात्र ते कायम दुर्लक्षित राहिलेले आहेत, असे त्या म्हणतात. त्या वास्तूंचा स्थापत्त्याच्या अंगाने अभ्यास आता झाला आहे.
पंढरपूर माहात्म्य
पंढरपूरचे माहात्म्य सांगणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही :-
- धन्य पंढरीची वारी (डॉ. अरविंद नेरकर)
- नामदेवांनी पाहिलेले पंडरपूर (डॉ. विजय बाणकर)
- पंढरपूरच्या अलक्षित कथा (वा.ल. मंजुळ)
- पंढरपूर दर्शन (प्रा. विजय गोविंदराव यंगलवार)
- पंढरपूर वारी आणि मराठी साहित्य (डॉ. अरविंद नेरकर)
- श्रीक्षेत्र पंढरपुरातील मठांचा इतिहास (फड आणि दिंड्यांसह) (वा.ल. मंजुळ)
- पंढरी माहात्म्य (गिरीधर कवी, ८ पृष्ठे, अपूर्ण ग्रंथ)
- पंढरी माहात्म्य (गोपाळबोध, इ.स. १६५०/१७४०)
- पंढरी माहात्म्य (प्रल्हादबुवा बडवे, शके १६४० पूर्वी)
- पंढरी माहात्म्य (रुद्रसुत, २३० ओव्या)
- परतवारी (सुधीर महाबळ)
- पाउले चालती पंढरीची वाट (ईश्वरलाल गोहिल)
- भूलोकीचे वैकुंठ- पंढरपूर (डॉ. बी.पी. वांगीकर)
- लोहदंड ऊर्फ पंढरपूरची कैफियत (मूळचे तमीळ भाषेतील, मोडी लिपीत लिहिलेले, इ.स. १८०७),
- विठ्ठल व पंढरपूर (प्रा. ग.ह. खरे)
- श्रीक्षेत्र पंढरपूर दर्शन (प.ज्ञा. भालेराव)
- श्रीक्षेत्र पंढरपूर माहात्म्य (सरस्वती कुलकर्णी)
- श्री विठ्ठल (उपासनाशास्त्र आणि पंढरपूर माहात्म्य, सनातन संस्था प्रकाशित)
- साने गुरुजी आणि पंढरपूर मदिर प्रवेश चळवळीचे अध्यात्म (आत्माराम वाळिंजकर)
- Pandharpur Mahatmya (इंग्रजी, लोकनाथ स्वामी)
- ज्ञात अज्ञात पंढरपूर लेखमाला ( आशुतोष बडवे )
आदि शंकराचार्यानी आठव्या शतकात ‘पाण्डुरंगाष्टक’ रचून- महायोग पीठे तटे भीमरथ्याम्। वरं पुण्डरिकाय दातुंमुनिंद्रै:।। विठ्ठलाला आठव्या शतकात नेले. त्यानंतर संस्कृतमधील ‘स्कंद’ आणि ‘पद्म’ पुराणातील पांडुरंग माहात्म्ये अभ्यासकांसमोर आली. या लोकप्रिय दैवतावर विविध भाषांतून माहात्म्ये लिहिण्याचा नंतर प्रघात पडला. त्यामध्ये आज उपलब्ध छापील हस्तलिखित स्वरूपामधील माहात्म्ये अशी-
१) गोपाळबोधाचे पंढरी माहात्म्य (काळ इ.स. १६५०/१७४०), २) बाळक व्यासकृत पांडुरंग माहात्म्य (कन्नड कवी; काळ मिळालेला नाही), ३) कन्नड कवी गुरुदास रचित पांडुरंग माहात्म्य (काळ इ.स. १६५० च्या सुमारास), ४) अनन्तदेव कृत (धुळ्यात हस्तलिखित, बारा अध्याय; काळ नाही), ५) रुद्रसुतरचित पंढरी माहात्म्य (काळ नाही, २३० ओव्या), ६) प्रल्हादबुवा बडवे विरचित पंढरी माहात्म्य (काळ शके १६४०पूर्वी) ७) तेनाली राम (आंध्रातील विकट कवी; तेलगू भाषेत, (काळ इ.स. १५६५ म्हणजे सर्वात जुने), ८) श्रीधरस्वामी नाझरेकर (मराठीतील विख्यात संतकवी रचना- इ.स. १६९०), ९) लोहदंड ऊर्फ पंढरपूरची कैफियत (मूळचे तमीळ भाषेतील, मद्रासच्या ओरिएंटल इन्स्टिटय़ूटमध्ये मिळाले. मोडी लिपीत लिहिलेले, काळ १८०७), १०) बाल मुकुंद केसरीचे पांडुरंग माहात्म्य (बडोद्याच्या प्राच्य विद्या संस्थेत आहे. काळ नाही.), ११) मराठीतील महिपतिबुवा ताहराबादकर (कांबळे) यांचे शके १६७८ मध्ये रचलेले, १२) संत नामदेवांचे अभंगात्मक पांडुरंग माहात्म्य, १३) दत्तवरदविठ्ठल (पेशवेकालीन कवी, नगर जिल्हा, जयकर ग्रंथालयात हस्तलिखित, काल १७४८-१७९८ इसवी), १४) हरि दीक्षित रचित पांडुरंग माहात्म्य (७ पृष्ठे फक्त उपलब्ध), १५) गिरीधर कवी रचित पंढरी माहात्म्य (८ पृष्ठे, अपूर्ण ग्रंथ), वगैरे.
संकीर्ण माहिती
पंढरपूर हे मराठी लेखक द. मा. मिरासदार आणि उल्लेखनीय चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांचे जन्मस्थळ आहे.
११ नोव्हेंबर १९४७ रोजी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी मुक्त झाले. साने गुरुजींनी त्यासाठी महात्मा गांधीचा विरोध पत्करून सत्याग्रह केला.[४]
वाहतूक व्यवस्था
हे सुद्धा पहा
विठ्ठल
'विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत मानले जाते.[१][२] विठोबा,विठुराया,पांडुरंग, 'महारनाथ व पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात पूजिली जाते.[२][३]
हिंदू देवता स्वरूपसंपादन करा
महाराष्ट्रीयन मराठा संप्रदायाचे सर्वोच्च देवता तसेच जनक प्रभु विठ्ठल पांडुरंग असुन त्यांनी इतर वारकरी संप्रदाय तसेच मराठ या वैश्विक संप्रदायाची स्थापना इ.सन.1192 मध्ये केली. म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाज सुद्धा प्रभु विठ्ठल पांडुरंगाची भक्ती/ पुजा करतात. यांचे कारण असे की प्रभु विठ्ठल पांडुरंग पंढरीनाथ असुन महारनाथ देखील आहेत. संत चोखामेळा हे महार जातींचे होते. तरीही त्यांनी प्रभु विठ्ठल पांडुरंगाची भक्ती /पुजा सोडली नाही. विठोबा या देवतेचा उगम आणि विकास ही विशेषतः मुळ महार,वैष्णव संप्रदायातील म्ह्तावाची संकल्पना म्हणून ओळखली जाते.[२] विठोबा हा श्रीहरी चा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे असे मानले जाते. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठ्लाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू होते. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेऊन, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते. विठोबा गेली २८ युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे. पुंडलिकाने विट फेकाल्याने आजही वारकरी त्याचा उल्लेख " पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय." असा करतात.
विठोबा हा महाराष्ट्रातील मराठा, वैष्णव, हिंदू ,वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे.[१][४] त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रात कर्नाटक सीमेजवळ पंढरपूर येथे आहे.[५] जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहित नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे 'चंद्रभागा' म्हणतात. विठोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे हिंदू आराध्यदैवत होय.[६] ा
संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथइत्यादी विठोबाचे थोर भक्त १३व्या ते १७ व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. कन्नड कवींनी कानडीश्लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे.[७] विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहेत.
पंढरपूरच्या विठ्ठलाचा दैनिक पूजाविधीसंपादन करा
महाराष्ट्राचे आराध्यदैवत प्रभु विठ्ठल पांडुरंगाची शासकीय महापूजा हि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री करतात. ती सर्वोच्च शासकीय महापूजा असते.
दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर[२]उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते. प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्रांप्रमाणे असतात. सव्वाचार वाजता काकड्याला सुरवात होते. कान्ह्या हरिदास रचित ‘अनुपम्य नगर पंढरपूर’ ही आरती म्हटली जाते. आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो. नंतर नित्यपूजा सुरू होते. त्यामध्ये प्रथम संकल्प, गणेशपूजा, भूमिपूजा, वरुणपूजा, शंखपूजा, घंटापूजा होते. त्यानंतर पुरुषसूक्ताचे पठण करत पूजा केली जाते. सकाळी ११ वाजता विविध पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.[८]
धूपारतीसंपादन करा
दुपारी चार वाजता विठ्ठलमूर्तीचा चेहेरा पुसून देवाला नवीन पोषाख आणि अलंकार घातले जातात. सायंकाळी सात वाजता धुपारती होते. या वेळी प्रथम पाद्यपूजा नंतर गंध लावून हार घालतात. धूप, दीप ओवाळून दहीभाताचा नैवेद्य दाखवतात. त्या वेळी उपस्थित हरिदास आणि भक्त मंडळी
‘जेवी बा सगुणा सख्या हरी, जेवी बा सगुणा,
कालविला दहीभात आले मिरे लवणा,
साय दुधावरी साखर रायपुरी कानवले चिमणा,
उद्धवचिद्घन शेष ही इच्छितो गोपाळा रमणा’’
हे पद म्हणतात. शेवटी ‘युगे अठ्ठावीस’ ही आरती म्हटली जाते आणि धुपारती होऊन उपचार संपतो.
बोला पुंद्लिक वर्धि हरि विठ्ठल श्री णॅय्न्देव तुकारम
शेजारतीसंपादन करा
नित्योपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेजारती. रात्री साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास शेजारती केली जाते. प्रथम विठ्ठलमूर्तीची पाद्यपूजा होते. त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोषाख बदलला जातो. धोतर नेसवून अंगावर उपरणे घातले जाते. डोक्याला पागोटे बांधले जाते. पोषाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात. देवाला गंध लावून नंतर हार घालतात. त्या वेळी ‘हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका’ इत्यादी आरत्या म्हटल्या जातात. शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि शेजारती संपते.
पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरातील वर्षभराचे नित्योपचारसंपादन करा
पहाटे ४ - मंदिर भाविकांसाठी खुले
पहाटे ४.१५ ते ६ - काकडआरती आणि नित्यपूजा
सकाळी ११ ते ११.१५ - महानैवेद्य
दुपारी ४.३० ते ५ - पोषाख नेसवणे
सायंकाळी ७ ते ७.३० - धुपारती
रात्री ११.४५ ते १२.४५ - शेजारती.[८]
बाबा पाध्येसंपादन करा
विठ्ठल भक्तीतून मंदिरातील सर्व उपासना, पूजाअर्चा करण्याची साग्रसंगीत व्यवस्था लावण्याचे श्रेय बाबा पाध्ये यांच्याकडे जाते.[९] बडवे यांनी विठ्ठलाचे आणि उत्पात यांनी रखुमाईचे पालकत्व घ्यायचे असा दंडक त्यांनी घालून दिला. बडवे आणि पुजारी या दोघांनी विठ्ठलाची नित्य सेवा, काकडारती, महापूजा, दुपारचा नैवेद्य, सायंकाळची आरती आणि शेजारती हे सर्व पहायचे. सात सेवाधाऱ्यांनी त्यांना मदत करायची आणि त्यांची कामेदेखील ठरलेली, अशी चोख व्यवस्था बाबा पाध्ये यांनी लावून दिली होती.[९]
संस्कृत पंडित असलेल्या बाबा पाध्ये यांनी रचलेल्या, विठ्ठलाची महती कथन करणाऱ्या १८ व्या शतकातील ‘श्रीविठ्ठल स्तवराज’ या संस्कृत काव्याचे हस्तलिखित पंढरपूर येथील मंजूळ घराण्याकडे आहे. या काव्यामध्ये ३५ श्लोक आहेत. हस्तालिखिताची सुरुवातच ‘नमो भगवते विठ्ठलाय’ अशी आहे. ‘छंद देवता कीलक न्यास’ या शास्त्रीय पद्धतीने हे काव्य रचले आहे. मात्र, हा काव्यग्रंथ अपूर्णावस्थेतच आहे. 'विठ्ठलध्यानमानसपूजा " या ग्रंथात बाबा पाध्ये यांनी विठ्ठल देवतेच्या रूपाचे वर्णन केलेले आहे.[९]
आळंदी-पंढरपूरची वारीसंपादन करा
देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीनेपंढरपूरला जातात[२].आळंदीहून संत ज्ञानेश्वर, सोपानदेवांची सासवडहून, मुक्ताईची एदलाबादहून आणि निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वर, संत तुकाराम महाराज यांची देहू येथून अश्या पालख्या पंढरपूरला येतात.[२] काही शतके ही परंपरा चालत आली आहे.[१०]
विठोबाशी निगडित कथासंपादन करा
विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आलेला व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. त्याचा (?) हा अवतार हा गयासुर नावाच्या राक्षसाच्या समूळ नाश करण्यासाठी द्वापार युगात झाला होता. त्यावेळी गयासुर अरीने सत्यश्रेष्ठ धर्माचा नाश करण्यासाठी देव गणांना भुलवण्याचे तथा गो-ब्राम्हण हत्येचे अखंड सत्र चालवले होते. यास्तव श्री मन्महा मूळ जगत्पित्याच्या आज्ञेने श्रीहरीने बौध्य नामे अवतार घेऊन गयासुराला अग्निकुंडात जाळून भस्म केले होते. नंतर त्याचा परमभक्त जो पुंडलिक यास भेटून स्वरूप दाखविले होते आणि मातापित्याची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते.
पांडुरंग माहात्म्यसंपादन करा
आजवर जी पांडुरंग माहात्म्ये उपलब्ध आहेत, त्यांत संस्कृतमधील स्कंदपुराण, पद्मपुराण आणि विष्णू पुराण यांतील तीन माहात्म्ये आहेत. मराठी भाषेत श्रीधर नाझरेकर, प्रल्हाद महाराज बडवे आणि गोपाळबोधो यांनी लिहिलेली माहात्म्ये प्रसिद्ध आहेत. शिवाय आणखीही काही माहात्म्ये आहेत.[११]
मराठी कवी श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी मराठी भाषेत पांडुरंग माहात्म्य रचले तो काळ इ. स. १६९० ते १७२० दरम्यानचा आहे. मात्र तेनाली राम यांनी रचलेले तेलुगू पांडुरंग माहात्म्य त्यापूर्वी म्हणजे इ.स. १५६५चे आहे. संस्कृत भाषेतील पंचमहाकाव्यांप्रमाणेच तेलुगू भाषेतही पाच महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक महाकाव्य म्हणून तेनाली राम यांच्या ‘पांडुरंग माहात्म्य्यनु’या रचनेचा उल्लेख केला जातो. तेनाली राम यांचे माहात्म्य स्कंद पुराणावर आधारित आहे. या काव्याचे पाच आश्वास (अध्याय) आहेत. शिव-पार्वती संवादातून या तेलुगू पांडुरंग माहात्म्याचे कथानक उलगडते. या माहत्म्यात दक्षिणतीरी पौंडरिक क्षेत्र असल्याचा उल्लेख आहे. हे महाकाव्य दक्षिणी भारतात भाविकांच्या पठणाचा भाग आहे.
अकबर-बिरबल, कालिदास – भोज राजा यांच्या चातुर्यकथा जशा प्रसिद्ध आहेत, तशाच तेनाली राम (काळ इ.स. १५०५ ते १५८०) यांच्याही कथा विख्यात आहेत.
साहित्यात व कलाक्षेत्रातसंपादन करा
पंढरपूरच्या विठ्ठलाशी संबंधित नवी माहिती, नवे विचार देणारे ‘कथा पांडुरंगाच्या’ हे पुस्तक वा.ल. मंजूळ यांनी लिहिले आहे. हस्तलिखितांतून सापडलेले विठ्ठलसहस्रनाम आणि इतर माहिती, अविंध संतांची विठ्ठलभक्ती, विठ्ठल मंदिरातली धार्मिक स्थळे आणि त्यांचा दुर्लक्षित इतिहास, पंढरपूरचा वास्तुवारसा, विठ्ठलावर संशोधन करणारे परकी संशोधक, विठ्ठलाव्यतिरिक्तचे पंढरपूर अशा वेगवेगळ्या विषयांवर मंजूळ यांनी लिहिले आहे. हस्तलिखितांतून आढळणारी संतचरित्रे, वेगवेगळ्या राज्यांतला विठ्ठल, कृष्णाचा विठ्ठल कसा झाला, विठ्ठल- पांडुरंग याविषयी माहिती देणाऱ्या हस्तलिखितांची सूची अशी माहितीही या पुस्तकांत आहे, याच बरोबर ही माहिती मंदिरांच्या भिंतींवरही कोरलेली आहे .[१२][१३]
पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.
याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्दर्शनाचा आणि चित्रपट दिग्दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.
२०१८ सालच्या डिसेंबर महिन्यात राजीव रुईया यांनी दिग्दर्शित केलेला 'विठ्ठल' नावाचा मराठी चित्रपट प्रकाशित झाला.[१४]
विठ्ठलासंबंधित अन्य पुस्तकेसंपादन करा
- एक विठ्ठल नाम (डाॅ. विद्यासागर पाटंगणकर)
- दादाभाऊ गावडे यांनी ’शोधिता विठ्ठल’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे.
- पी. विठ्ठल यांनी लिहिलेल्या 'शून्य एक मी' या संग्रहात 'विठ्ठल : एक संवाद' या नावाची एक कविता आहे.
- शोध पांडुरंगाचा (डाॅ. अनिल सहस्रबुद्धे)
मराठी विठ्ठलगाणी आणि कवितासंपादन करा
विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते, भक्तिगीते, चित्रपटगीते, कविता आणि नाट्यगीते लिहिली आहेत. त्यांतली काही ही -
- अगा करुणाकरा (कवी - संत तुकाराम, संगीत - श्रीनिवास खळे, गायिका - लता मंगेशकर, राग - तोडी)
- अगा वैकुंठीचा राया (गायक - राम मराठे, नाटक - संत कान्होपात्रा)
- अजि मी ब्रह्म पाहिले (कवी - संत अमृतराय महाराज, संगीत - श्रीनिवास खळे, गायिका - आशा भोसले, राग - जयजयवंती)
- अणुरेणिया थोकडा (कवी - संत तुकाराम, गायक - भीमसेन जोशी, संगीत - राम फाटक, राग - मालकंस)
- अधिक देखणें तरी (कवी - संत ज्ञानेश्वर, संगीत - राम फाटक, गायक - पं. भीमसेन जोशी, राग - यमन)
- अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग (गायक - जितेंद्र अभिषेकी, संगीत राम फाटक, चित्रपट - संत चोखा मेळा)
- अभंगाची गोडी करी ज्यास वेडी (कवयित्री - शांताबाई जोशी, संगीत - दशरथ पुजारी, गायिका - सुमन कल्याणपूर
- अवघा रंग एक झाला (गायिका - किशोरी आमोणकर)
- अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर (कवी- अशोकजी परांजपे, गायक - प्रकाश घांग्रेकर, नाटक - गोरा कुंभार)
- आधी रचली पंढरी (कवी - संत नामदेव, गायक - मन्ना डे)
- आता कोठे धावे मन (गायक - भीमसेन जोशी, संगीत - राम फाटक)
- आनंदाचे डोही आनंद तरंग (गायिका - लता मंगेशकर)
- आरंभी वंदीन अयोध्येचा राजा (गायक - भीमसेन जोशी)
- आली कुठूनशी कानी, टाळ-मृदुंगाचि धून, नाद विठ्ठल विठ्ठल (कवी - सोपानदेव चौधरी; संगीतकार/गायक - वसंत आजगावकर)
- इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची (कवी - ग.दि. माडगूळकर, ,संगीत दिग्दर्शक - पु.ल. देशपांडे, गायक - भीमसेन जोशी, चित्रपट- गुळाचा गणपती, राग - भीमपलास)
- एकतारी संगे एकरूप झालो (गायक - सुधीर फडके)
- कानडा हो विठ्ठ्लू करनाटकू तेणे मज लावियला वेधू - (पहा - पांडुरंग कांती)
- कानडा राजा पंढरिचा, वेदांनाही नाही कळला अंतपार याचा (गायक वसंतराव देशपांडे व सुधीर फडके, चित्रपट - झाला महार पंढरीनाथ)
- काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग (गायक - भीमसेन जोशी, संगीत - राम फाटक)
- कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर (गायक - पं. जितेंद्र अभिषेकी, नाटक - गोरा कुंभार)
- खॆळ मांडियेला वाळवंटी ठायी (गायिका - लता मंगेशकर)
- चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी (कवी - दत्ता पाटील, गायक - अनुराधा पौडवाल, विठ्ठल शिंदे)
- चल गं सखे चल गं सखे पंढरिला (गायक - विठ्ठल शिंदे)
- चला पंढरीसी जाऊ (गायक - मन्ना डे)
- जन विजन झाले आम्हां (गायक - रामदास कामत
- जाता पंढरीस सुख वाटे (गायक - भीमसेन जोशी, संगीत - राम फाटक)
- झाला महार पंढरीनाथ (गायक वसंतराव देशपांडे, चित्रपट - झाला महार पंढरीनाथ)
- टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं (गायक भीमसेन जोशी व वसंतराव देशपांडे, चित्रपट - भोळी भाबडी)
- टाळी वाजवावी, गुडी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची (कवी - चोखा मेळा)
- तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल (गायक - भीमसेन जोशी, संगीत - राम फाटक)
- तुझे रूप चित्ती राहो (गायक - सुधीर फडके, चित्रपट - संत गोरा कुंभार)
- देऊळातल्या देवा या हो (कवयित्री - शांताबाई जोशी, संगीत - दशरथ पुजारी, गायिका - सुमन कल्याणपूर)
- देव माझा विठू सावळा (गायिका - सुमन कल्याणपूर)
- दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला (गायक - देवदत्त साबळे)
- देह जावो अथवा राहो (गायिका - सुमन कल्याणपूर)
- नको देवराया अंत आता पाहू, प्राण तो सर्वथा जाऊ पाहे
- नामाचा गजर गर्जे भीमा तीर (गायक - भीमसेन जोशी, संगीत - राम फाटक)
- निजरूप दाखवा हो (चित्रपट - झाला महार पंढरीनाथ)
- निर्गुणाचा संग धरिला जो आवडी (गायिका फय्याज, नाटक - गोरा कुंभार)
- पंढरीनाथा झडकरी आता ((कवी - पी. सावळाराम, संगीत - वसंत प्रभू, गायिका - आशा भोसले)
- पंढरिचा वास चंद्रभागे (गायक - भीमसेन जोशी)
- पंढरीचे सुख नाहीं (संगीत - राम फाटक)
- पंढरी निवासा सख्या (संगीत - राम फाटक)
- पाउले चालती पंढरीची वाट (कवी - दत्ता पाटील, संगीत - मधुकर पाठक गायक - प्रल्हाद शिंदे)
- पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती ... कानडा हो विठ्ठलू करनाटकू (कवी - संत ज्ञानेश्वर, गायिका - आशा भोसले, संगीत - हृदयनाथ मंगेशकर)
- पांडुरंग त्राता पांडुरंग दाता (संगीत - राम फाटक)
- पावलों पंढरी वैकुंठभुवन (संगीत - राम फाटक)
- फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार (कवी -ग.दि. माडगूळकर, गायक - सुधीर फडके, चित्रपट - प्रपंच)
- बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल (गायक - पं. जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर)
- भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी . (गायक- कवी- संगीतकार ???)
- भेटीलागी जीवा लागलीसे आस (कवी - संत तुकाराम, संगीत - श्रीनिवास खळे, गायिका - लता मंगेशकर)
- माउली माउली रूप तुझे (चित्रपट - लई भारी, संगीत - अजय अतुल, गायक - अजय गोगावले )
- माझे माहेर पंढरी (कवी संत एकनाथ, गायक - भीमसेन जोशी, संगीत राम फाटक/किशोरी आमोणकर; राग - भूप नट)
- या विठूचा गज हरिनामाचा (गायक - शाहीर साबळे)
- येई हो विठ्ठले माझे माउली
- ये गं ये गं विठामाई (कवयित्री - संत जनाबाई, गायिका - आशा भोसले, संगीत - वसंत प्रभू)
- राजस सुकुमार मदनाचा पुतळा (कवी - संत तुकाराम, गायक - भीमसेन जोशी, संगीत - श्रीनिवास खळे, राग - शिवरंजनी)
- रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले वो साजणी (कवी - संत ज्ञानेश्वर, गायक - भीमसेन जोशी/आशा भोसले; चित्रपट - संत निवृत्ती ज्ञानदेव; संगीत - सी. रामचंद्र)
- लाखात लाभले भाग्य तुला गं बाई, विटेवरच्या विठ्ठलाची झालिस रखुमाई (कवयित्री - शांताबाई जोशी, संगीत - दशरथ पुजारी, गायिका - सुमन कल्याणपूर)
- विटेवरच्या विठ्ठलाची (कवयित्री [[शांताबाई जोशी, संगीत - दशरथ पुजारी, गायिका - सुमन कल्याणपूर)
- विठू माउली तू माउली जगाची माउलीत मूर्ती विठ्ठलाची (गायक - सुधीर फडके, जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकरव चंद्रशेखर गाडगीळ; संगीत - अनिल अरुण, चित्रपट - अरे संसार संसार)
- विठू माझा लेकुरवाळा (कवयित्री - संत जनाबाई, गायिका - आशा भोसले)
- विठूरायाची पंढरी तिथे नांदतो श्रीहरी
- विठ्ठल आवडी प्रेमभावो (कवी - संत नामदेव, गायक - सुरेश वाडकर, राग - मालकंस)
- विठ्ठल गीती गावा (संगीत - राम फाटक)
- विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला (गायिका - लता मंगेशकर)
- विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी
- विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत (कवी - दत्ता पाटील, गायक - प्रल्हाद शिंदे)
- विठ्ठलाच्या पायी थरारली वीट (गायक - भीमसेन जोशी, चित्रपट - देवकीनंदन गोपाला)
- विठ्ठला समचरण तुझे धरिते (कवी - पी. सावळाराम, संगीत - वसंत प्रभू, गायिका - लता मंगेशकर, राग - नट, भूप)
- संतभार पंढरीत (संगीत - राम फाटक)
- सावळे सुंदर रूप मनोहर (कवी - संत तुकाराम, गायक - भीमसेन जोशी, संगीत - श्रीनिवास खळे, राग - मालकंस)
- सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले (गायिका - सुमन कल्याणपूर)
- सुंदर ते ध्यान उभे विटेवरी (गायिका - लता मंगेशकर)
- ज्ञानियांचा राजा (संगीत - राम फाटक)
(अपूर्ण यादी)
विठ्ठल आरतीसंपादन करा
१) युगे अठ्ठावीस
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।
तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी । कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर नित्य येती भेटी । गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।। जय देव ।। 2।।
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा । राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवळिती राजा विठोबा सावळा।। जय देव ।।3।।
ओवाळू आरत्या विठोबा सावळा ।। जय देव ।।3।।
ओवाळू आरत्या कुर्वड्या येती । चंद्रभागेमाजी सोडुनिया देती । दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय देव ।।4।।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।। दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती। केशवासी नामदेव भावे ओंवळिती।। जय देव जय देव ||5||
२) येई हो विठ्ठले
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥ आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥ पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥ पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥ गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥ विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥ विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥
चित्रदालनसंपादन करा
हंपी(कर्नाटक) येथील विट्ठल मंदिर रथ
हंपी(कर्नाटक) येथील विट्ठल मंदिर
पंढरपूर विट्ठल मंदिर

Comments
Post a Comment